परीक्षा दिलेल्या प्रत्येकालाच परीक्षेचा अभ्यास लक्षात राहतो. सर्वात जास्त लक्षात राहतो तो परीक्षेचा आदला दिवस. तो दिवस म्हणजे युद्धपातळीवरच्या अभ्यासाचा असतो. आपल्यातल्या बऱ्याच जणांनी त्यांच्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी रात्ररात्रभर जागरण करून अभ्यास केला असणार. आजही मुलं रात्ररात्रभर पाठांतरात घालवतात. चहा कॉफी तर लिटर लिटरभर रिचवली जाते.
कधी विचार केला आहे का हा अभ्यास आपल्या मेंदूसाठी चांगला असतो की वाईट ? बरेचजण म्हणतील की आदल्या रात्री अभ्यास केला म्हणून मी पास झालो. अशी काही उदाहरणं सोडली तरी प्रश्न तिथल्या तिथेच आहे. जागरण करून केलेला अभ्यास मेंदूसाठी चांगला असतो का ? आजच्या जागतिक निद्रा दिनानिमित्त आपण या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत.









