परीक्षेत चांगले मार्क मिळवण्याचं मुलांवर प्रचंड दडपण असतं. थ्री इडियट्सच्या भाषेत सांगायचं तर चांगले मार्क्स नाही मिळाले तर चांगली नोकरी नाही मिळणार, चांगली नोकरी नाही मिळाली तरी कोणता बाप आपली मुलगी देणार आहे?
तर, आता परिस्थिती थोडी सुधारली आहे. परिक्षेत चांगले मार्क्स मिळवण्याचं जे प्रेशर मुलांवर पूर्वी होतं ते आता कमी झालंय. परीक्षेत कमी मार्क्स मिळाले म्हणजे मुलाचं भविष्यात काहीच होणार नाही हा गैरसमज दूर होतोय.






