आपल्या संस्कृत मध्ये निळावंती नावाचा एक ग्रंथ आहे. असं म्हणतात की हा ग्रंथ वाचून कोणीही पशुपक्षांची, प्राण्यांची भाषा समजू शकतो आणि त्यांच्याशी संवाद साधू शकतो. मंडळी, आजच्या काळात वाचायला कोणाला वेळ आहे आणि निळावंतीचं म्हणाल तर अशी अफवा आहे की निळावंती वाचून लोकांना वेड लागतं आणि ते ६ महिन्यातच मरतात. या अफवेने तर निळावंतीच्या वाटेला कोणी सहसा जात नाही.
पण आजच्या जमान्यात विज्ञान फार पुढे गेलेलं आहे. निळावंती जरी नाही वाचली तरी विज्ञानाच्या आधारे तुम्ही प्राण्यांशी संवाद साधू शकता. नुकतंच वैज्ञानिकांनी चक्क मधमाशांची भाषा समजण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केलं आहे. यानिमित्ताने आपण पाहूया मधमाशा कशा संवाद साधतात आणि त्याचा माणसाला कसा उपयोग होणार आहे ?








