आयुर्वेद पावसाळ्यातल्या आहाराबद्दल काय म्हणतो?

आयुर्वेद पावसाळ्यातल्या आहाराबद्दल काय म्हणतो?

उन्हाळ्यात शरीरातला रस आणि स्नेह शोषला जातो. यामुळे जाठराग्नी मंद होऊन वातासारखे दोष वाढतात. या वाढलेल्या दोषांमुळे अग्नी अधिकच मंद होतो. अशावेळी प्रयत्नाने योग्य आहार-विहारांद्वारे अग्नीची शक्ती वाढवावी लागते.

 

त्यासाठी आयुर्वेदिक ग्रंथांनुसार काय कराल पावसाळ्यात – 

-आहारामध्ये योग्य प्रमाणात मधाचा वापर करा.

-या काळात शरीरातला वायू खूप वाढत असल्याने आहारात आंबट, खारट आणि स्निग्ध पदार्थ घ्या.

-जेवणात जुनी धान्ये वापरा आणि चांगला रस्सा बनवून त्यासह योग्य मसाल्यांनी सुसंस्कृत केलेले मांस खा.

-या दिवसांत मध मिसळून मोहाचे किंवा औषधी मद्य प्या.

-पावसाळ्यात पाणी उकळून आणि गाळूनच प्या.

-कोरड्या आणि खरखरीत कापडाने अंग रगडून घ्या.

-कोरडे, सुगंधित आणि स्निग्ध औषधी चूर्ण अंगाला उटण्याप्रमाणे चोळून अंघोळ करा.

-सुवासिक फुलांच्या माळा वापरा.

 -स्वच्छ, तलम कपडे घाला.

-ओलसरपणा किंवा दमटपणा नसलेल्या जागी निवास करा.

 

हे झाले काय करावे याबद्दल. याबरोबरच काय टाळावे याचेही मार्गदर्शन आपले ग्रंथ करतात

-पावसाळ्यात दिवसा झोपू नका.

- शुद्धीकरणाची प्रक्रिया न करता पावसाळ्यात पाणी पिऊ नका.

-अति व्यायाम करणे टाळा.

-फार उन्हात बसू नका.

-अति स्त्रीसहवासाचा त्याग करा.

पावसाळ्यात, अशाप्रकारे वाढलेल्या दोषांचे शमन करणारा आणि अग्नी, म्हणजे पर्यायाने भूक वाढवणारा आहार-विहार करून आपली शक्ती टिकवून ठेवावी.

टॅग्स:

Bobhatamarathi infotainment

संबंधित लेख