भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली T20 कर्णधार म्हणून नामिबियाविरुद्ध शेवटचा सामना खेळला. T20 विश्वचषकात भारताचा खेळ साजेसा न झाल्याने संघाला बऱ्याच रोषाचा सामना करावा लागला. पाकिस्तान आणि न्यूझिलंडविरुद्धचा पराभवामुळे भारताचे आव्हानच संपुष्टात आले. तेव्हापासून कर्णधार म्हणून विराट कोहलीवर बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. त्यानंतर शेवटच्या तीन सामन्यांत भारताने विजय मिळवले. शेवटच्या सामन्यात भारताने नामिबियाचा नऊ गडी राखून पराभव करून स्पर्धेचा शेवट केला.
कर्णधारपद सोडल्यानंतरही विराट कोहलीने त्याच्या नावावर असे विक्रम केले आहेत जे अजून कोणत्याही कर्णधाराने केले नाहीयेत. यातले अनेक विक्रम तो अजूनही करू शकतो कारण एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार म्हणून तो भारताकडून खेळत आहे. आज अशाच महत्वाच्या विक्रमांवर एक नजर टाकूयात.







