असे म्हटले जाते की भारतात क्रिकेट शिवाय कुठल्याच खेळाला भारतीय प्रेक्षक दाद देत नाहीत. पण, जर कालच्या सोशल मीडियावर आलेल्या पोस्टचा महापूर बघितला तर आपल्या लक्षात येईल भारतीय प्रेक्षकही आता प्रत्येक खेळामध्ये रुची घेऊ लागलेला आहे. पी. व्ही. सिंधूने भारताला बँडमिंटनमध्ये पहिले जागतिक अजिंक्यपद मिळवून दिल्यानंतर प्रत्येक भारतीयाने तिचे अभिनंदन केले आहे. भारतीयांना अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट आहे.
आजच्या लेखामध्ये आपण पी व्ही सिंधूच्या खडतर प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.








