जुन्या काळात छोट्या मोठ्या दुखण्यांसाठी आज्जी आपला बटवा उघडत असे. डोकेदुखीला सुंठाचा लेप, पोटदुखी म्हणले की ओवा आणि गरम पाणी, पित्त म्हणले की आले आणि लिंबू.. वगैरे..
भरपूर कष्ट आणि गावातले हवापाणी यामुळे लोक आजारी पडत नसत. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि यंत्रयुगात लोकांचे आयुष्य यंत्रासारखे झाले आहे. लोक दिवस उजाडला की घराबाहेर पडतात आणि दिवसभर धावपळ करून मेहनत करून थकतात. घरी येतात आणि जेवून झोपतात. या अशा दगदग करण्यामुळे आम्लपित्त, पोटदुखी, डोकेदुखी आणि मायग्रेन सारख्या समस्या डोके वर काढत आहेत.













