अंदाजे १००० वर्षांपूर्वी दक्षिण भारतातल्या कर्नाटक राज्यात पश्चिम गंग वंशाचे राजे राज्य करत होते. कावेरी नदीच्या काठी वसलेले तालकडू शहर हे पश्चिम गंग वंशाचे राजधानीचे शहर होते.
म्हैसूर शहरापासून हे शहर ४५ किलोमीटर लांब असून या शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. एकेकाळी भरभराटीला आलेल्या ह्या शहरात जवळपास ३० मंदिरे होती. पण अचानक बदललेल्या कावेरी नदीच्या प्रवाहामुळे हे शहर वाळवंटात बदलले. परंतु आजही लोकांना असे वाटते की या मागे एक शाप आहे.










