आजवरच्या माहितीनुसार पृथ्वी हा सजीव सृष्टी असणारा सूर्यमालेतील एकमेव ग्रह असावा. पृथ्वीवर जैवविविधता असल्याने अनेक प्रकारचे सजीव आपल्याला पहायला मिळतात. जेव्हा पृथ्वीवर सजीव निर्माण झाले त्यावेळी त्यांचे स्वरूप वेगळे होते. डायनोसॉरस, ऱ्हायनोसॉरस, महाकाय असे आकाराने प्रचंड जीव इथे होते याचेही दाखले मिळाले आहेत.. परंतू भूस्खलन, भूकंप, ज्वालामुखींचे उद्रेक, नष्ट होत गेलेले अधिवास इत्यादी कारणांमुळे हे जीव नामशेष होत गेले. कालांतराने पुन्हा जीवसृष्टीचा उदय झाला. हे नवीन सजीव आकाराने लहान व वैविध्यपूर्ण होते. यातच माणसाचाही समावेश होता.
आपल्या इतर सजीवांच्या मानाने विकसित बुद्धी आणि मेंदूच्या जोरावर माणसाने प्रचंड प्रगती केली. आपल्यासाठी अनेक भौतीक सुखसोयी निर्माण केल्या, आपले जीवन संपन्न बनवले. ही झाली नाण्याची एक बाजू. दुसऱ्या बाजूला त्याने आपल्या सोयीसाठी जंगले तोडली, अनेक प्रकारची प्रदूषणे आणि ग्रीनहाऊस गॅसेस सारख्या हानीकारण आणि पर्यावरण विघातक गोष्टी जन्मास घातल्या. याचा परिणाम होऊन इतर सजीवांपैकी जे जास्त संवेदनशील होते असे अनेक सजीव त्यांच्या संपत गेलेल्या नैसर्गिक अधिवासामुळे एकतर नष्ट झाले किंवा दुर्मिळ झाले किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यांपैकी बरेचसे सजीव केवळ प्राणी नाहीत तर अनेक वनस्पतीही आहेत..आणि त्यातले बरेचसे आपल्या अवतीभवती, शेजारच्या देशांमध्ये, आपल्या देशाच्या समुद्रकिनाऱ्यांजवळ आढळणारे सजीव आहेत. असे अनेक प्राणी, ज्यांना आपण तरी पाहिलं असेल, पण आपल्या येणाऱ्या पिढ्या त्यांना केवळ पुस्तकांतून, चित्रांतून,अँनिमेशनमधून पाहतील. कारण, ते आपल्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कोण आहेत हे प्राणी?
'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन' ने अशा ५१ संवेदनशील प्राण्यांची यादी केली आहे. त्यातील अनेक प्राणी आपल्या देशात, आपल्या खंडात आढळतात. कोण आहेत हे प्राणी जे जागतिक तापमानवाढीमुळे आणि संपत चाललेल्या नैसर्गिक अधिवासामुळे नष्ट होत आहेत? मागच्या भागात आपण ८ प्राण्यांची यादी बघितली होती. या यादीत आणखी ८ प्राण्यांची नावे पाहूया.












