मंडळी, पृथ्वीची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. हवामान बदलासोबतच इतर बाजूने देखील निसर्गाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय. याची झळ आता भारताला सुद्धा बसू लागली आहे. भारतातील ३ प्राण्यांच्या जाती नष्ट झाल्याच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालंय.
‘युनाइटेड नेशन्स कॉनव्हेन्शन टू कॉम्बेट डेझर्टिफिकेशन’ या अधिवेशनात मांडण्यात आलेल्या संशोधनात भारतातील ३ लुप्त झालेल्या प्राण्यांच्या जातींची नावे आहेत. भारतीय चित्ता, गुलाबी डोक्याचे बदक, माळढोक पक्षी हे ते तीन प्राणी. या प्राणी प्रजाती नष्ट होण्याचं कारण आहे जंगलतोड आणि वाळवंटीकरण







