भारतीयांना अभिमान वाटेल अशी एक बातमी काल आली. जगातलं दारिद्र्य कमी करण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयोगाबद्द्ल माईकेल क्रेमर, एस्थर डूफ्लो आणि भारताचे अभिजित बॅनर्जी यांना एकत्रितपणे २०१९ चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
अभिजित बॅनर्जी यांच्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. नोबेल पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल जाणून घेणं महत्वाचं ठरेल.










