दिगेंद्र कुमार आणि त्यांच्या तुकडीवर ४५९० पॉईंट घेण्याची जबाबदारी होती. हा पॉईंट कारगिलच्या टोलोलिंग हिल, द्रास भागात होता. या पोईंटवर शत्रूची तब्बल ११ ठाणी होती. यापैकी पहिलं आणि अकरावं ठाणं उध्वस्त करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. या मोहिमेच्या सुरुवातीलाच शत्रू सैन्याच्या हल्ल्यात कुमार यांचे बरेच साथीदार मारले गेले. यात या तुकडीचे मुख्य मेजर विवेक गुप्त सुद्धा मारले गेले.
हा हल्ला झाल्यानंतर कुमार यांना गोळ्या लागल्या. तो पर्यंत तुकडीतले जवळजवळ सगळेच जवान मारले गेले होते. मरणापूर्वी जवानांनी कुमार यांना आपली हत्यारे दिली होती. त्यानंतर कुमार हे एकटेच लढत राहिले. त्यांनी शत्रूवर १८ ग्रेनेड्स फेकले. त्याचवेळी शत्रू सैन्यातून अचानक मेजर अन्वर खान तिथे आला. अन्वर खान आणि कुमार यांच्यात झटापट झाली. कुमार यांना आपली बंदूक गमवावी लागली पण या समोरासमोरच्या लढाईत शेवटी कुमार यांनी अन्वर खानचा गळा कापला. अखेर ४५९० पॉईंट मिळवण्यात यश आलं.
या युद्धाचा शेवट त्यांनी टोलोलिंग हिल वर तिरंगा फडकावून केला. त्यांच्या या पराक्रमासाठी त्यांना महावीर चक्र देऊन गौरवण्यात आलं. महावीर चक्र मिळालेले ते एकमेव सैनिक आहेत. त्यांनी दिलेला लढा हा खरच अद्भुत होता. एलओसी सिनेमात अवतार गिल यानी दिगेंद्र कुमार यांची भूमिका केली होती.
एक दुःखद गोष्ट म्हणजे दिगेंद्र कुमार यांचं पुढचं जीवन हालाखीचं गेलं. त्यांना सरकारच्या तुटपुंजा पेन्शनवर जागावं लागत आहे. सरकारने त्यांना जवळजवळ २० एकर जमीन देण्याचं वचन दिलं होतं पण ते वाचन अद्याप पूर्ण झालेलं नाही.
माहिती स्रोत १ आणि २