पाऊस सुरु झाला की रानभाजांची चंगळ सुरु होते. या रानभाज्या रानोमाळी कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात. सध्याच्या ऑरगॅनिक फूडच्या जमान्यात वर्षातून एकदाच येणारा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने ऑरगॅनिक फूड असतो. कोणतंही खत किंवा कीटकनाशक नाही हेच काय कोणतीही लागवड नाही. अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच.
या प्रकारच्या रानभाज्या मुरबाड, वसई, कर्जत, पालघर, सफाळे या ठिकाणी आढळतात. या भागातील आदिवासी मुंबई ठाण्यासारख्या भागात येऊन या भाज्या विकततात. पण मंडळी आपल्यातल्या अनेकांना या भाजांची नावे माहित नसतात. त्यामुळे प्रत्येकालाच या भाज्या घेता येत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही रानभाजांची नावे आणि त्यांची थोडक्यात माहिती देणार आहोत.








