ही अगदी फिल्मी ‘सत्य घटना’ आहे. पण बऱ्याचदा खरं आयुष्य हे सिनेमापेक्षा जास्त ‘फिल्मी’ असतं. जुन्या फिल्म्समध्ये एक कथानक हमखास यायचं. मुलगा किंवा मुलगी लहानपणी हरवते आणि मोठं झाल्यावर त्याला/तिला सगळं आठवतं. या घटनेतही असाच काहीसा प्रकार घडला आहे.
मारिया ही ५ वर्षांची असताना हरवली आणि ती केरळच्या इडुक्की येथे पोहोचली. तिथे एका रिक्षावाल्याने तिला बघितलं आणि तिला घेऊन तो पोलीस स्टेशनला गेला. त्यावेळी मरीयाला नीट ऐकू येत नव्हतं आणि तिला बोलण्यातही समस्या येत होती. पोलिसांनी चौकशी केल्यावर तिला आपल्या घराचा पत्ता सांगता आला नाही. तिने आपलं नाव मात्र एका कागदावर लिहून दिलं. तिचं खरं नाव होतं ‘अमिना’. तिने हेही सांगितलं की ते ५ भाऊ बहिण आहेत.






