भारतात सध्या लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे, पण जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरूच ठेवण्यात आलाय. तरी रोजचा भाजीपाला, फळे यांच्या विक्रीवर मोठा परिणाम झालेला दिसतो. साहजिकच लॉकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे आवक घटली आहे. शिवाय होलसेल व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
पुण्यात मात्र ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही. का ? कारण पुणेकरांना भाजीपाला, फळे घरपोच मिळणार आहेत.






