COVID-19 आजारामुळे समाजातील तळागाळातील जनतेला मोठा फटका बसणार आहे. विशेषतः शेतकरी, कामगार वर्ग, कर्मचारी वर्ग, विधवा आणि जे पेन्शनवर जगत आहेत अशा व्यक्तींना आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. म्हणूनच आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तब्बल १.७० लाख कोटी रुपयांचा मदत निधी घोषित केला आहे. हा मदतनिधी वेगवेगळ्या भागात विभागलेला आहे, त्याचा फायदा देशातील विशेषतः गरीब जनतेसाठी वापरण्यात येईल.
कोणकोणत्या क्षेत्रासाठी किती निधी राखीव ठेवण्यात आला आहे हे आजच्या लेखातून आपण जाणून घेऊया.








