पाकिस्तानच्या जेलमध्ये गेलेला भारतीय माणूस परतणे मोठे कठीण काम असते. अनेकांचे भारतात परतण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही, तर जे परत येतात ते भरभरून जगण्याचा आनंद घेतात. पण एक आजीबाई मात्र या सगळ्याला अपवाद ठरल्या आहेत.
तब्बल १८ वर्षे पाकिस्तानच्या जेलमध्ये राहून परत आलेल्या हसीना बेगम या ६५ वर्षीय आजीबाईचे भारतात आल्याच्या अवघ्या १५ दिवसांत निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यु झाला आहे.






