पुराणातल्या कथांमध्ये ऋषीमुनींनी, राजांनी, भक्तांनी देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्षे तपश्चर्या केल्याची उदाहरणे वाचायला मिळतात. अन्नाचा एक कणही न खाता किंवा पाणीही न पिता हे तप केले जायचे. आता ह्या पुराणातल्या गोष्टी झाल्या. आजच्या काळात अन्न न खाता कोणी जिवंत राहू शकतं का? तर उत्तर असेल ‘नाही’.
पण जगात असेही काही लोक होऊन गेले किंवा आजही आहेत ज्यांना वाटतं, की माणूस अन्नाशिवाय राहू शकतो. या लोकांना breatharians म्हणतात. सोप्या भाषेत असे लोक जे ‘हवा खाऊन’ जिवंत राहतात. ह्या तत्त्वज्ञानाला breatharianism म्हटले जाते. आयुर्वेदात म्हटल्याप्रमाणे प्राणासाठी सूर्यप्रकाश गरजेचा असतो. Breatharians चा यावर गाढ विश्वास असतो. केवळ सूर्यप्रकाश आणि प्राणवायूवर मानव जिवंत राहू शकतो हे ते ठामपणे सांगतात.
खरी गोष्ट तर अशी की हे तथाकथित breatharians लपूनछपून अन्न घेतात. ज्यांनी ह्या गोष्टीला मनावर घेतले आणि अत्यंत कठोरपणे त्याचे पालन केले त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आज आम्ही अशाच एका आपले प्राण गमावलेल्या मुलीची कथा सांगणार आहोत.









