नाझी राजवटीत ज्यूंना मारण्यासाठी त्यांना त्यांच्या गावातून उचलून एका खड्ड्याजवळ आणलं जायचं तिथे त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जायच्या. मग त्याच खड्ड्यात त्यांना पुरलं जायचं. अशा प्रकारच्या खुनाची आठवण करून देणारं भारतातलं ‘हाशिमपुरा हत्याकांड’ होतं.
१९८७ साली बाबरी मशिदीच्या प्रकरणावरून उत्तर प्रदेश भागात जातीय दंगल उसळली होती. १४ एप्रिल पासून मेरठच्या भागात घरांची व दुकानांची जाळपोळ, हत्या, लुटमारीला नुसता उत आला होता. मे पर्यंत शहरात अनेकदा संचारबंदी लागू करण्यात आली. संचारबंदीनेही फरक पडला नाही म्हणून सैन्याला बोलावण्यात आलं. १९ आणि २० मे रोजी पोलीस, PAC (Provincial Armed Constabulary) चे जवान आणि सैन्याने मिळून शोध मोहीम आरंभली. शोध मोहिमेत स्फोटकं आणि हत्यारं सापडली.








