परवाच बंगलोर शहराचा ट्राफिकच्या बाबतीत जगात पहिला नंबर लागलेला आहे. मुंबईचं अजून तसं काही झालेलं नाही. बंगलोर इतकी नसली तरी मुंबईत पण ट्राफिकची समस्या आहे. मेट्रो आणि रस्त्यांच्या कामांमुळे ही समस्या वाढतच असते. ट्राफिकमध्ये अडकणे हा तर त्रास असतोच पण तो वाढवण्याचं काम हॉर्नचा आवाज करत असतो. काही लोकांना वाटतं की सतत हॉर्न वाजवल्याने ट्राफिक पुढे सरकेल. पण तसं न होता डोकेदुखी मात्र वाढते.
तर, मुंबईच्या ट्राफिक पोलिसांनी या समस्येवर आता एक जालीम आणि रामबाण उपाय शोधून काढला आहे. ट्राफिक पोलिसांनी केलेला हा भन्नाट प्रयोग पाहा.






