जवळजवळ २ महिन्यांपासून इराकी नागरिक भ्रष्ट्राचार, गरिबी आणि दडपशाही विरुद्ध आंदोलन करत आहेत. तळागाळातल्या सामान्य नागरिकांनी केलेलं इराकच्या इतिहासातलं हे सर्वात मोठं आंदोलन आहे असं म्हटलं जातंय. रोजच हजारो नागरिक तहरीर चौकावर जमत आहेत आणि रोजच त्यांच्यावर पोलिसांकडून हल्ला केला जातोय.
या सर्व आंदोलनात भारतातली रिक्षा मुख्य भूमिका बजावत आहे असं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल का ? नक्कीच खरं वाटणार नाही, पण हे सत्य आहे.









