अर्ध्या रात्री रिक्षा किंवा टॅक्सी मिळणे हे जिकिरीचे काम असते. त्यातही मिळाली तरी भाडे अव्वाच्या सव्वा आकारून कठीण वेळेचा फायदा कसा करून घ्यायचा हे त्यांना चांगलेच माहीत असते. कॅब आधीच महाग असल्याने प्रत्येकाला परवडेल असे नाही. मग अशावेळी उपयोगी पडतो तो जुगाड!!
जुगाड करण्यात भारतीयांचा हात कुणीच धरू शकत नाही. कठिणातल्या कठीण परिस्थितीत अफलातून जुगाड कसे करावेत हे भारतीयांकडून शिकायला हवं.






