सध्याच्या कोरोनाकाळात मास्क वापरणे कितीही आवश्यक असले तरी अनेकांना मास्क वापरणे जीवावर येत आहे. त्यामागचं एक मोठं कारण म्हणजे मास्क घातल्यावर जवळच्या लोकांना ओळखणंही अवघड होऊन बसलंय. रोजरोज तोच मास्क काय घालायचा हे ही कारण, विशेषत: स्रीवर्गासाठी महत्त्वाचं आहेच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना मास्कमुळे आपली ओळख हरवली जातेय की काय असं वाटत आहे.
पण आपला देश तर मुळातच जुगाडू लोकांचा आहे. मग आताही देशभरात क्रिएटिविटीला पूर आला नसता तर नवलच. अशातच केरळमधल्या एका माणसाने एक वेगळीच डोकॅलिटी लढवली आहे. काय आहे ती भन्नाट आयडिया चला पाहूया.








