आपण आपल्या मित्रांचा वाढदिवस साजरा करतो, आपल्या कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस साजरा करतो. काही त्यांच्याकडे कामाला असलेल्या लोकांचा वाढदिवस साजरा करतात आणि काही तर त्यांच्या पाळीव प्राण्यांचा वाढदिवस साजरा करतात. आपल्याला पण त्यांचे खूप कौतुक वाटते. वाटायलाच पाहिजे कारण त्यांना त्या लोकांबद्दल किंवा प्राण्यांबद्दल स्वतःच्या कुटुंबातील सदस्य अशी भावना असते. पण शेतात असलेला पिकाचा वाढदिवस साजरा करून त्या पिकाला पत्र लिहिणारा माणूस पाहिला आहे का मंडळी? नाही ना?

तर, आम्ही आज अश्याच एका शेतकऱ्याची ओळख करून देणार आहोत ज्याने आपल्या वांग्याच्या पिकाला पत्र लिहिले आहे. हे थोडं आश्चर्यकारक वाटते ना? पण त्याला कारण पण तसेच आहे मित्रांनो. भर दुष्काळात जेव्हा बाकीची पिके माना टाकत होते तेव्हा नंदुरबार जिल्ह्यातील कुंदन पाटील या शेतकऱ्याला वर्षभर चांगले वांगे आले. आणि त्याला दुष्काळी वर्षाची झळ बसली नाही. पाऊस कमी आणि वर्षभर रोगांची साथ असताना सुद्धा या वांग्याच्या पिकाने त्याची साथ सोडली नाही. तर मंडळी कुंदनने त्याच्या वांग्याला काय लिहिले आहे हे वाचण्याची उत्सुकता वाढली असेल तर जास्त उशीर न करता आम्ही ते पत्र खाली जसेच्या तसे देत आहोत.




