आजूबाजूचे जग आज किती झपाट्याने बदलत आहे. नवनव्या तंत्रज्ञानामुळे आयुष्य अधिकाधिक सुलभ होण्याच्या वाटेवर असताना काही गोष्टी मात्र अजिबात बदलेल्या नाहीत. आजही महिलांवर होणारे शारीरिक, मानसिक अत्याचार थांबलेले नाहीत. आज महिला आणि लहान मुले कुठेही कधीही अशा प्रकारच्या अत्याचाराला बळी पडू शकतात इतका त्या फोफावल्या आहेत.
म्हणून महिलांना कायद्याने आणखी विशेष संरक्षण देण्याची मागणी गेली कित्येक दिवस केली जात होती आणि पूर्वीही असे अनेक कायदे करण्यात आलेले आहेत. गेल्याच वर्षी हैद्राबाद मध्ये एका डॉक्टरचा अमानुष पद्धतीने बलात्कार करून तिला जाळण्यात आले. त्यानंतर संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली होती. यावर हैद्राबाद सरकार तत्काळ आपल्याकडील महिला सरंक्षण कायद्यांची चाचपणी केली आणि पिडीत महिलेला लवकरात लवकर न्याय मिळण्यात कसल्याही प्रकारच अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन दिशा कायदा संमत केला. आंध्रप्रदेशच्याच पावलांवर पाउल ठेऊन आता महाराष्ट्रातही याच धर्तीवर एक नवा कायदा मांडण्यात येणार आहे.










