देशात क्रांती का होते, या प्रश्नाला अनेक उत्तरं देता येतील. त्यातलं एक उत्तर म्हणजे राज्यकर्ते आणि सामान्य जनता यांच्यात प्रचंड मोठी दरी असणे. जनतेवर राज्य करणारे राज्यकर्तेच जर जनतेच्या प्रश्नांना ऐकून घेत नसतील, जनतेवर अत्याचार करत असतील, मनमानी करत असतील तर जनतेच्या हातात उठाव करण्यावाचून दुसरा पर्याय उरत नाही. अशावेळी जर जनतेला योग्य नेतृत्व मिळालं तर क्रांती यशस्वी होण्याचे मार्ग सुलभ होतात.
इतिहासात जागोजागी अशा घटनांचे उल्लेख आढळतात. उदाहरणार्थ, फ्रेंच क्रांती, रशियन क्रांती, क्युबन क्रांती, चीनची क्रांती आणि इराणची क्रांती.















