पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने १४ तारखेला भारतीय जवानांवर हल्ला केला. या हल्ल्याने भारतीयांच्या तळपायातली आग मस्तकात गेली. या हल्ल्याचा बदला घ्या अशी सगळ्या स्तरातून मागणी होऊ लागलीय. काल १५ फेब्रुवारीला या दिशेने भारताने एक वेगळं पाऊल उचललं आहे. भारताने पाकिस्तानला दिलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतलेला आहे.
या निर्णयाने सर्वांचंच समाधान झालं आहे असं नाही, कारण 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला तर पाकिस्तानचं काय वाकडं होणार आहे असा प्रश्न पडला होता. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत.
चला तर आज समजून घेऊया 'मोस्ट फेवर्ड नेशन' म्हणजे काय आणि हा दर्जा काढून घेतल्याने काय परिणाम होऊ शकतो ?








