मेजर सोमनाथ शर्मा हे भारतातील पहिले परमवीर चक्र पदक प्राप्त सैनिक होते. देश स्वातंत्र्य झाल्याबरोबर पाकिस्तानने आपल्यासोबत संघर्ष सुरू केला. यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे सैनिक लढले त्यात मेजर शर्मा यांचे नाव आधी घ्यावे लागेल.
सोमनाथ शर्मा यांचा जन्म ३१ जानेवारी १९२३ रोजी हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे झाला होता. त्यांना कुटुंबातूनच सैनिकी पंरपरा लाभली होती. त्यांच्या वडिलांनी लाहोरमध्ये डॉक्टरकीची संधी सोडून भारतीय सैनिकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला.








