आपण आयुष्यात कधी ना कधी हा विचार करतोच की पासपोर्ट व्हिसाची कटकट नसती तर मी हवं तसं, हवं तेव्हा आणि हवं तिथं जगभर भटकलो असतो. हे आजच्या काळात अशक्य आहे. पण ७० च्या दशकापूर्वी हे तितकंसं कठीण नव्हतं. लंडन ते भारत आणि भारतातून पुढे सिंगापूर ते थेट ऑस्ट्रेलियापर्यंत बसने प्रवास शक्य होता.
या गोष्टीवर विश्वास बसणं थोडं अवघड आहे. कारण लंडन ते कलकत्ता (त्यावेळचं कलकत्ता आणि आजचं कोलकाता) या दोन शहरांत जवळजवळ ११ देशांचं अंतर आहे. याबद्दल माहिती शोधली असता समजलं की अशी बस सेवा त्याकाळी खरंच अस्तित्वात होती. हा एवढा मोठा प्रवास कसा शक्य होता आणि तो कसा चालायचा, या प्रवासाला सुरुवात कुठून झाली आणि त्याचा अंत कसा झाला या सर्व मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत.
















