भारतात रेल्वे मार्ग आला आणि त्यामागून समृद्धीही आली. काही जणांच्या मते ब्रिटिशांना रेल्वेमुळे भारताची लुट करणे सोपे झाले. तसेही असेल. पण, रेल्वेमुळे भारतात कितीतरी बदल झाले. पुढे पुढे हा रेल्वेमार्ग विस्तारत गेला आणि भारताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत प्रवास करणे सोपे झाले. भारतातील रेल्वे मार्गाला दीडशे वर्षापेक्षा जास्त जुना इतिहास आहे. तसाच या रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पुस्तकांच्या स्टॉलला तितकाच जुना इतिहास आहे.
तुम्ही कधी विचार केला आहे का, की रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पुस्तकांच्या स्टॉलला फक्त ए. एच. व्हीलर बुक्स स्टॉल अँड प्रायव्हेट लिमिटेड हेच नाव का असते? म्हणजे मुंबईच्या प्लॅटफॉर्मवरील स्टॉल असो, पुण्याच्या असो की कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी कुठल्याही रेल्वे प्लॅचफॉर्मला हेच नाव दिलेले तुम्हाला आढळेल. या मागचा नेमका इतिहास काय आहे? चला तर आज समजून घेऊ या.










