आज निर्भयाच्या सर्व हत्याऱ्यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं. २०१२ साली घडलेल्या या घटनेला यावर्षी ६ वर्ष पूर्ण होतील.

६ डिसेंबर २०१२ रोजी ही घटना घडली होती. या घटनेने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वादळ उठलं. कधी नाही ती बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होऊ लागली. अनेक मोर्चे निघाले, आंदोलनं झाली, निषेध नोंदवले गेले. या सर्वांचं फळ आज मिळालं आहे.
या ६ वर्षांमध्ये खूप काही बदललं. ६ आरोपींपैकी एकाने २०१३ साली आत्महत्या केली तर एकमेव अल्पवयीन आरोपीला ३ वर्षाची शिक्षा व बालसुधार गृहात ठेवल्यानंतर २०१५ साली सुटका करण्यात आली. असं म्हणतात की हा अल्पवयीन मुलगाच या गुन्ह्यात सर्वात जास्त हिंसक होता.

मंडळी. ६ वर्षात बदल तर अनेक झाले पण एक गोष्ट बदलली नाही ती म्हणजे बलात्काराचं प्रमाण. भारतातील बलात्काराची आकडेवारी बघितली तरी समजतं की भारतात अनेक निर्भया आजही आहेत.
खालील आकडेवारी बघितली तर तुम्हालाही हे पटेल !!




