जगभरात रोजच्या रोज अशा घटना घडत असतात ज्या पाहून ऐकावं ते नवलच असं वाटतं. हरियाणामधल्या कुरुक्षेत्र येथे अशीच एक विचित्र घटना घडली आहे. एक चहावाला बँकेत कर्ज घ्यायला गेला तर बँकवाल्यांनी चक्क आधीचे ५० कोटी परत कर म्हणून त्याला सुनावले.
भारतात भिकाऱ्यांचेसुद्धा कित्येक फ्लॅटस् असतात. तिथे चहावाल्याने पण ५० कोटींचे कर्ज घेतले तर काही विशेष वाटणार नाही. पण कर्जप्रकरणं एवढी सोपी असतात का? बँक कर्ज देण्याआधी तुम्ही ते परत करू शकता का हे ही तपासत असते. ५० कोटींचे कर्ज घेणारा मनुष्य एका छोट्याशा टपरीवर चहा विकणार नाही हे साधंसोपं गणित आहे. असो.






