महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेंनी केली की आणखी एक अज्ञात हात या कटाचा भाग होता? सरकारने किंवा पोलीसांनी काही पुरावे नष्ट केले? ही चर्चा आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचली आहे. १९४८ साली महात्मा गाधींची हत्या झाल्यावर जवळजवळ सत्तर वर्षांनंतर पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
या मागची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न केला तर असे आढळून येते की जगातल्या अनेक आवडत्या लाडक्या व्यक्तिंचा मॄत्यु अचानक झाल्यावर या मृत्युमागे काहीतरी काळेबेरे असल्याच्या चर्चा सुरु होतात. या चर्चा केवळ अफवा असतात असे नव्हे. प्रत्येक प्रकरणात काही प्रश्नांची उकल होत नाही. अनेक चौकशी आयोग नेमले जातात. संशयाला वाव देणारे अनेक प्रसंग या निमित्ताने जनतेच्या समोर येतात. काही दिवस चर्चा होतात आणि नाहीशा होतात.
अशाच काही खळबळजनक चर्चांचा आढावा आज आपण बोभाटात घेणार आहोत.








