सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीवर दहशतवाद्यांनी ड्रोन हल्ला केला. हा हल्ला कंपनीच्या दोन प्लांट्सवर झाला आहे. या हल्ल्याने दिवसभराच्या तेल उत्पन्नाच्या ५७ लाख बॅरल इतकं प्रमाण कमी झालं आहे. सोप्प्या शब्दात बाजारात येणारा एकूण तेल पुरवठा ५ टटक्क्यांनी कमी होणार आहे.
याचा भारतावर कसा परिणाम होईल?
आधीच आपल्याकडे पेट्रोलचे भाव अधूनमधून वाढत असतात. या घटनेने पुढच्या काही दिवसात पेट्रोलचे भाव हमखास वाढण्याची शक्यता आहे. अरामकोने म्हटल्याप्रमाणे काही दिवसातच नुकसान भरून काढण्यात येईल, पण तेल उत्पादन पूर्वपदावर यायला आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो.














