महात्मा गांधींना नाटक-चित्रपट याबद्दल नावडच होती हे सुप्रसिध्द आहे. तीच गोष्ट क्रिडा-खेळ संबंधात म्हणता येईल. अर्थात हे पूर्ण सत्य नव्हे !
महात्मा गांधींच्या शालेय काळातील त्यांच्या आठवणी त्यांच्या वर्गमित्रांनी लिहिल्या आहेत. त्यापैकी एक रतिलाल घेलाभाई मेहता यांनी ते आणि गांधी राजकोट इथे आल्फ्रेड हायस्कूलमध्ये ते एकत्र असतानाच्या आठवणी लिहिल्या आहेत. त्यांनी असं म्हटलंय की गांधीजी तेव्हा क्रिकेट खेळत असत. ते चांगले फलंदाज आणि गोलंदाजही होते.
आता मोठ्या लोकांना ते मोठे झाल्यावर त्यांचे पाय पाळण्यात असतानाच दिसत होते असं म्हणत त्यांच्या नावावर अनेक गोष्टी खपवल्या जातात. असंही होत असतं.








