१७ व्या लोकसभा निवडणुका १९ मे रोजी संपणार आहेत. त्यानंतर २३ मे ला निकाल जाहीर होतील. ज्याला सर्वाधिक मतं मिळतील तो जिंकणार हे साधं गणित आहे, पण समजा दोन उमेदवारांमध्ये टाय झाला असेल तर ?? अशावेळी कशाप्रकारे निर्णय घेण्यात येतो माहित आहे का ??
मंडळी, विचार करायला लावणारी गोष्ट आहे. दोन उमेदवारांना समान समान मतं मिळाली असतील तर जिंकणार कोण ? राव, इथे नशीब हा भाग महत्वाचा ठरतो. कारण अशावेळी निवडणूक आयोगाकडून नाणे फेक करून किंवा लॉटरीद्वारे विजेता ठरवला जातो !!








