बाजरातून आणलेल्या फळांवर व भाज्यांवर हानिकारक घटकांचा एक थर असतो. यात कीटकनाशक, धूळ तसेच जीवाणू सुद्धा असू शकतात. त्यामुळे अन्नपदार्थ न धुता तशीच पोटात गेल्यास पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. आता यावर घरगुती उपाय म्हणजे फळे आणि भाज्या धुवून खावेत. पण राव फक्त धुतल्याने फळांवरची धूळ, कीटकनाशक आणि जीवाणू साफ होतात का ? याचं उत्तर विज्ञानाने शोधून काढलंय राव.
नवीन वैज्ञानिक प्रयोगातून फळे आणि भाज्या धुण्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्यात आला आहे. या परीक्षणात विविध पद्धतींचा अभ्यास केला गेला आणि त्यांचा परिणाम तपासला गेला. यात सर्वोत्तम कोणता पर्याय ठरला...चला बघूया....









