चांद्रयान मोहीम आपल्या नियोजित पद्धतीने जात होती. इस्रोचे शास्त्रज्ञ समाधानी होते. शेवटच्या टप्प्यात विक्रम लँडर चंद्राच्या भूमीवर उतरणार होता. इतकं झालं की मोहीम यशस्वी होणार होती, पण काही अज्ञात कारणांनी विक्रम लँडरशी शेवटच्या क्षणी संपर्क तुटला.
चांद्रयान मोहिमेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं. मोहीम अवकाशात झेपावून आज ४७ दिवस पूर्ण झाले आहेत. शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.








