(प्रातिनिधिक फोटो)
स्टार वॉर्स सिरीज तर पाहिलीच असेल तुम्ही… त्यातली माणसे किंवा रोबोट्स पृथ्वीवर न लढता अंतराळात युद्ध लढताना पाहून विचार केला असेल की हे खरंच शक्य आहे का? म्हणजे त्या मध्ये फक्त अमेरिका वगैरे देश दाखवतात, पण भारताला हे शक्य आहे का? तर हो! भारतालाही ते शक्य आहे!
कसं आहे मंडळी, या जगात पूर्वीपासूनच विकसित देश आणि विकसनशील देश यांच्यात एक छुपी स्पर्धा सुरू असते. विकसित देशांकडे असलेले उच्च तंत्रज्ञान हे त्यांना विकसनशील देशांना द्यायचे नसते. जसे श्रीमंत लोक गरिबांना निम्न दर्जाची वागणूक देतात तसंच हे. मग अश्या वेळी एखादा गरीब समजला जाणारा व्यक्ती जेव्हा स्वतः कष्ट घेऊन कमाई करून पैसे मिळवून श्रीमंतांची बरोबरी करायला जातो तेव्हा त्याच्यावर आरोप केले जातात. आता असेच आरोप भारतावरही केले जाणार आहेत. कारण? आजची महत्वपूर्ण घोषणा! आता भारत जगातील चौथा देश बनला आहे जो ‘अँटी सॅटेलाईट मिसाईल’ या तंत्रज्ञानाने सज्ज आहे. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर आता भारताकडेही ही शक्ती आली आहे… ‘मिशन शक्ती!’








