भारतीय क्रिकेट संघ हा जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. खेळाडू वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या सामन्यात खेळत असतात. त्यामुळे क्रिकेटमध्ये टिकून राहण्यासाठी तंदुरुस्तीची फार महत्त्वाची भूमिका असते. फिटनेस राखण्यासाठी हे खेळाडू केवळ जिममध्ये तासनतास घाम गाळत नाहीत, तर त्यांच्या आहाराचीही खूप काळजी घेतात. खूप जणांना वाटत असेल हे खेळाडू मांसाहार करत असल्याने तंदुरूस्त राहतच असतील. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल भारताचे आघाडीचे खेळाडू हे चक्क शाकाहारी आहेत.आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा क्रिकेटर्सबद्दल सांगत आहोत जे शाकाहारी आहेत.
अर्थात, काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. या खेळाडूंतले काही जन्मापासून शाकाहारी आहेत, काही शाकाहारी होते पण काहीकाळ मांसाहार चाखून पुन्हा केवळ शाकाहारी बनले आणि काही अट्टल मांसाहारी होते, त्यांनीही नंतर शाकाहारी बनण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे त्यांचे स्वत:चे निर्णय आहेत. शाकाहार श्रेष्ठ की मांसाहार यावर आम्हांला काही म्हणायचे नाही. पण फक्त मांसाहारानेच आरोग्य चांगले बनते असं वाटत असेल, तर ही यादी वाचून तुमचे मत नक्कीच बदलेल.













