एकेकाळी प्रवासाला कित्येक महिने लागत असत. त्याच काळाचा प्रत्यय या लॉकदाऊनमध्ये पुन्हा आला. स्थलांतरितांना गाड्या बंद असल्याने कित्येक आठवड्यांचा पायी प्रवास करावा लागला. पण आजच्या घडीला एका चांगल्या गाडीलासुद्धा प्रवासासाठी कित्येक महिने लागतील का? तर उत्तर आहे हो!!!
एयरोस्पेस प्रॉडक्टसच्या निर्मितीसाठी ऑटोक्लेव मशीन घेऊन एक ट्रक नाशिकहून केरळमधल्या तिरुवनंतपुरमसाठी दहा महिन्यांपूर्वी निघाला होता. तो आता कुठे तिथे जाऊन पोचला आहे. विशेष गोष्ट म्हणजे या ट्रकला चक्क ७४ चाके होती. जवळपास १७०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत हा ट्रक कसाबसा आपल्या मुक्कामावर पोचला आहे.







