मुंबईत ६० च्या दशकात ट्राम बंद झाली. प्रवास करण्यासाठी बस, रिक्षा, टॅक्सि आणि लोकल रेल्वे हे चारच मार्ग उरले. खाजगी वाहन असेल तर उत्तम नाही तर या चार पर्यायांवर आणि खास करून लोकलवर अवलंबून राहावं लागतं.
३ वर्षापूर्वी यात आणखी एक भर पडली. ती म्हणजे मेट्रोची. सुरुवातीला ३ मेट्रो लाईन्सचा प्रकल्प आखण्यात आला होता. सध्या ३ चे १४ झाले आहेत. संपूर्ण मुंबईत, ठाण्यात मेट्रोचं काम सुरु आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हे मेट्रोचं जाळं कुठपर्यंत पसरलेलं असेल, आपल्याला त्याचा कसा फायदा होणार आहे, त्यात किती स्टेशन्स असतील, हे काम कधी पूर्ण होईल इत्यादी इत्यादी.
आज आम्ही मुंबई मेट्रोच्या संपूर्ण जाळ्याची सविस्तर माहिती घेऊन आलोय. तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात का पाहा.
























