(प्रातिनिधिक फोटो)
कोरोना रोगाची लागण होऊनही एका नवविवाहितेने बंगळूरू येथून दिल्ली आणि मग आग्र्यापर्यंत प्रवास केला. ही बातमी काही दिवसापासून प्रचंड विनोदाचा विषय बनली आहे. लोकांनी या नवविवाहित स्त्रीला भरपूर ट्रोल केलंय. पण ही बातमी खरी आहे का?
सर्व प्रमुख वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी ही बातमी लावून धरली होती, पण आता समजतंय की ही बातमी खोटी होती. मग नेमकं काय घडलंय?







