रॉ!!! हे नाव वाचता बरोबर कित्येकांच्या अंगावर काटा उभा राहतो. गेली ७० वर्षे भारताच्या अंतर्गत आणि बाहेरील अशा दोन्ही शत्रूंशी दोन हात करणारी ही संस्था. ह्या संस्थेने घडवलेल्या काही महान गुप्तहेरांच्या कहाण्या तुम्ही वाचल्या. पण आज अशा अफलातून माणसाची कथा आपण वाचणार आहोत ज्यांनी रॉ घडवली.
१९६२ साली भारताचा चीनसोबतच्या युद्धात पराभव झाला, त्याला कारण होते आपल्याला शत्रूराष्ट्रांच्या हालचाली व्यवस्थित टिपता आल्या नव्हत्या. हीच गोष्ट बऱ्यापैकी १९६५ च्या युद्धातसुद्धा नजरेत आली होती. म्हणून तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी एक पूर्णपणे स्वतंत्र अशा संस्थेची स्थापना करायचे ठरवले. हे काम त्यांनी सोपवले एका अत्यंत प्रभावशाली अशा अधिकाऱ्यावर, त्यांनी या संस्थेची ब्ल्यू प्रिंट बनवली आणि त्यांनाच या संस्थेचे पहिले डायरेक्टर करण्यात आले. सोबतच त्यांनी Aviation research centre ची देखील स्थापना केली होती.








