पाहिलं प्रेम कधीही विसरलं जात नाही म्हणे. तुम्हीही हे वाक्य अनेक ठिकाणी वाचलं असेल, अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल, पण तुम्ही कधी कुणाच्या जीवनात पाहिलं प्रेम तब्बल ५० वर्षांनी परत आल्याचं पाहिलं आहे का? तुम्ही म्हणाल काही तरीच काय अशा गोष्टी फक्त पिक्चर मध्येच होतात.
अशी न पटणारी गोष्ट घडली आहे राजस्थान मधील एका ८२ वर्षाच्या वृद्धाच्या बाबतीत. राजस्थानच्या थार जिल्ह्यातील कुलधरा गाव हे झपाटलेले असल्याचे मानले जाते. याच अंधश्रद्धेमुळे आज या गावात फक्त एक व्यक्ती सोडल्यास कुणीच वास्तव्य करत नाही. ८२ वर्षाचा हा म्हतारा मानवी वस्तीची चाहूल नसलेल्या या गावाची राखण करतो. या म्हाताऱ्याचे अखंड आयुष्य याच गावात गेले तेही एकट्याने. त्याने अलीकडेच आपली गोष्ट सांगितली, जी सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.








