चामड्याची उत्पादने निसर्गासाठी हानिकारक असतात. कशी ते आधी समजून घेऊया.
कोणत्याही कातड्याला वापरण्या योग्य बनवण्यासाठी मोठ्याप्रमाणात रसायनांचा मारा करावा लागतो. ही रसायने निसर्गासाठी हानिकारक तर असतातच, पण या रसायनांमुळे कातड्याचं विघटन होत नाही. प्रत्येकालाच कातड्याच्या वस्तू परवडत नाहीत म्हणून हल्ली खोट्या कातड्याच्या वस्तू बाजारात मिळतात. हे खोटं कातडं प्लास्टिकपासून तयार केलेलं असतं.







