मान्याच्या खडतर प्रवासाबद्दलची पोस्ट नुकतीच सोशल मीडियावर शेयर झाली आहे त्या मुलाखतीत तिने सांगितलं आहे की, 'मी आणि माझ्या कुटुंबाने बर्याच रात्री उपाशी पोटी आणि न झोपता घालवल्या आहेत. रिक्षाला, बसला पैसे नसायचे म्हणून कितीतरी किलोमीटर मी पायी चालले आहे. इतके वर्ष गाळलेला घाम, केलेलं अथक परिश्रम याचं चीज झालं. हा विजय खूप मोलाचा आहे. रिक्षाचालकाची मुलगी असल्याने पैसे मिळवणे खूप महत्वाचे होते म्हणून मी अगदी लहान वयातच नोकरी करायला लागले.'
मान्या पुढे म्हणाली की, 'मला पुस्तकांची आवड होती. पण नशिबाने कधी साथ दिली नाही. माझ्या आई- वडिलांचे काही दागिने गहाण ठेऊन माझ्या परीक्षेची फी भरावी लागली. पैसे कमी असल्याने शिक्षण घेणे खूप कठीण जायचं.तरीही पदवी मी यशस्वीपणे पूर्ण केली. माझ्यासाठी माझ्या आई-वडिलांनी खूप त्रास सहन केला. मी १४ वर्षांची असताना घरातून पळाले होते. मी दिवसा अभ्यास करायचे. संध्याकाळी भांडी घासायला जायचे आणि रात्री कॉल सेन्टरमध्ये काम करायचे. रिक्षाचं भाडं वाचवण्यासाठी मी तासन्तास चालून घरी पोहोचायचे. कॉलेजेमध्येही रिक्षाचालकाची मुलगी असल्याने खूप हिणवले जायचे. आज मी फेमिना मिस इंडियाच्या मंचावर आहे. माझे पालक आणि भावाला आज माझा अभिमान आहे. मी फक्त एवढंच सांगेन की, जर आपल्या स्वप्नांवर आपला विश्वास असेल आणि ते पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असाल तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही.'