१९४७ साली भारत स्वतंत्र झाला आणि देशात स्वकियांचे राज्य आले. त्यासोबतच स्वकीयांच्या कर्तृत्वाची नांदी सुरू झाली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशात काही तयार होत नव्हते असे नाही, पण एकेक करत अनेक पठ्ठे मैदानात उतरले आणि देशात अनेक गोष्टी बनायला सुरुवात झाली. काही नव्या गोष्टी होत्या, तर काही जुन्याच गोष्टी नव्या पद्धतीने आणि भारतीय बनावटीने बनू लागल्या.
मोटारी हा असाच भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय!! सुरुवातीच्या काळात मोटारनिर्मितीमध्ये अनेक कंपन्यांनी नाव कमावले. त्यातल्या टाटासारख्या कंपन्या आजही दिमाखात उभ्या आहेत. पण काही कंपन्या मात्र काळासोबत पडद्याआड गेल्या. अशीच एक कंपनी म्हणजे अरविंद कार कंपनी!!









